शूरवीर शिवरायांचे मावळे थोडक्यात माहिती

 

           

          शूरवीर शिवरायांचे मावळे थोडक्यात माहिती

शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी केलेल्या युद्धात अनेक मोहरे कामी आले. बाजी पालसकर, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, शिवा काशीद, हिरोजी फर्जंद, प्रतापराव गुजर,मुरारबाजी यासारखे अनेक मोहरे होते त्यांनी स्वराज्यासाठी व आपल्या महाराजांसाठी स्वत:च्या प्राणांचे बलिदान केले. या महान वीरांच्या मृत्यूने महाराजांना अपार दु:ख झाले. या वीरांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याची महाराजांनी जबाबदारी उचलली.

"धन्य ते शिवाजी धन्य त्यांचे मावळे"  
दादोजी कोंडदेव : दादोजी कोंडदेव मलठण गावचे होते. पंतांचा स्वभाव करारी व निष्ठावान होता. पंतांना बालशिवाजी व जिजाऊसोबत जेव्हा पुण्याच्या जहागीरीची व्यवस्था पाहण्यास पाठविले होते, तेव्हा ते वृद्ध झालेले होते. पंतांना जहागिरीचा कारभार, कोंढाणा सुभ्याचा कारभार इ. कामे कारावी लागत. यावर शिवाजी महाराजांनी बारकाईने निरीक्षण केले.
राजगुरू दादोजी कोंडदेव आणि बालशिवाजी 
त्यांच्या शिस्तीचा राजांवर चांगला परिणाम झाला होता. अत्यंत प्रामाणिक व शिस्तीचे पुरस्कर्ते दादोजी कोंडदेव हे स्वराज्याचा पाया घालणारे पहिले शिलेदार होते. दादोजी कोंडदेवांनी ७ मार्च १६४७ ला स्वराज्याचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने शिवरायांना अपार दु:ख झाले.

कान्होजी जेधे : कान्होजी जेधे हे कारी येथील वतनदार होते. शहाजीराजांनी पुढे रणदुल्लाखानकडून जेधे यांना आपल्याकडे मागून घेतले व आपल्याबरोबर कर्नाटकात नेले. शहाजीराजांना जुलै १६४८ मध्ये अटक झाली त्या वेळी कान्होजी जेधे व त्यांचा कारभारी दादाजी कृष्ण लोहकरे यांनाही अटक झाली.

कान्होजी जेधे 
त्यानंतर शहाजीराजांनी कोंडदेव यांच्या मृत्युनंतर कान्होजी जेधे यांना शिवाजीराजांकडे विश्वासाचे व कर्तबगार माणूस म्हणून पाठविले.

नेताजी पालकर : नेताजी पालकर सुरुवातीपासूनच स्वराज्याच्या पायाभरणीस होता. नेताजी पालकरने जवळ-जवळ प्रत्येक लढाईत भाग घेतलेला आहे. नेताजीला प्रती शिवाजी म्हंटले जाते ते उगीच नाही. पन्हाळगडाचा वेढा तोडण्यासाठी सिद्दी हिलाल व नेताजी पालकर चालून आले; परंतु विजापूरकरांच्या प्रचंड सेनेपुढे त्यांचे काही चालले नाही. मुघलांच्या वतीने विजापूरकरांच्या विरुद्ध लढत असताना पन्हाळगड महाराजांना जिंकता आला नाही.

प्रती शिवाजी नेताजी पालकर 
महाराजांना नेताजीकडून कुमक लवकर मिळाली नाही. त्यावेळी नेताजी पालकर व शिवाजी महाराज यांच्यात शाब्दिक कुरबुर झाली. नेताजी रागावला व रागाच्या भरात आदिलशहास भेटला; पण तिथेही तो जास्त काळ टिकला नाही. नंतर मुघलांना जाऊन मिळाला. मुघलांनी त्यास इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. त्याला महमंद कुलीखान नाव दिले. तिथे नऊ वर्ष राहून अत्यंत वाईट परिस्थिती गेली. महाराजांनी  19 जून १६७६ रोजी प्रायश्चित्तपूर्वक व विधीपूर्वक नेताजीला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश दिला. नेताजीला शुद्ध करून महाराजांनी औरंगजेबाला मोठा धक्का दिला.

हंबीरराव मोहिते : हंबीरराव मोहिते यांचे संपूर्ण नाव आनंदराव मकाजी मोहिते असे होते. हंबीरराव हा महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांचा भाऊ व प्रतापराव गुजर यांचा मित्र होता.

सरसेनापती हंबीरराव मोहिते 
प्रतापराव गुजर गेल्यानंतर खुद्द बहलोलखानाची जहागीर संपगाव लुटून बरीच संपत्ती घेऊन तो शिवाजी महाराजांकडे दाखल झाला. तेव्हा मार्च १६७४ मध्ये त्याचा सन्मान करून शिवाजी महाराजांनी त्याला हंबीरराव अशी पदवी देऊन सेनापती म्हणून प्रतापरावाच्या जागी त्याची नेमणूक केली.

कोंडाजी फर्जंद : कोंडाजी फर्जंद नाव घेतले की पन्हाळगड डोळ्यासमोर उभा राहतो. अफजलखानाच्या वधानंतर आठ दिवसात पन्हाळा स्वराज्यात आला होता; परंतु सिद्दी जोहारच्या वेढ्याच्या वेळी झालेल्या तहात पन्हाळा विजापुरकरांना परत द्यावा लागला. महाराजांची इच्छा होती पन्हाळा स्वराज्यात असावा. त्यावेळी अगदी लाख मोलाचा माणूस त्यांनी उचलला..कोंडाजी फर्जंद!

वीर कोंडाजी फर्जंद 
अवघ्या साठ मराठ्यांनी गड जिकला. पूर्वी सिद्दी जोहारला चाळीस हजार फौजेनिसी झगडूनही जो गड मिळू शकला नव्हता तो गड चिमुटभर मराठ्यांनी जिंकला. संभाजीराजांच्या काळात त्याने  जंजिरा किल्ला घेण्यासाठी सिद्दीच्या गोटात जाऊन तिथे आपण सिद्द्यांना फितूर झालो असे भासविले. संपूर्ण जंजिरा किल्लाच उडवून देण्याचा डाव होता पण त्यातच त्याचा अंत झाला.             

बाजीप्रभू देशपांडे : पन्हाळगडावरून विशाळगडावर येताना महाराजांचा पाठलाग करणाऱ्या सिद्धी जौहारच्या सैन्याला महाराज गडावर पोहचेपर्यंत घोडखिंडीत स्वत:च्या हिमतीवर थोपवून धरणारा आणि महाराज गडावर पोहचल्याची तोफांची सलामी एकूण प्राण सोडणारा बाजी प्रभू देशपांडे.

लाख मेले तरी चालतील परंतु, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे 

बाजीप्रभूंचा संसार मोठा होता. त्यांचा एकुलता एक मुलगा बाबाजी प्रभू चांगला जनता कर्तबगार होता. महाराजांनी त्याला सरनौबतीच्या जमेनिशीचा दरख सांगितला. बाजीच्या कुटुंबीयांस महाराजांनी उघडे पडू दिले नाही. त्यांचे सांत्वन केले.

तानाजी मालुसरे : रात्रीच्या वेळेस कोंढाणा किल्ल्यावर निवडक मावळ्यांसह जाऊन गडाचा किल्लेदार उदयभान राठोड यास तानाजीचा वज्राघाती तडाखा उदयभानाला बसला! उदयभानाचा शिलाघाती प्रहार तानाजीवर कोसळला! स्वत:च्या मरत्या क्षणी राखून ठेवलेला शेवटचा घाव त्याने वैऱ्यावर घातला. सिंहगडावर भगवा झेंडा चढला, तानाजीचे बलिदान अमर झाले.

तान्हाजी मालुसरे 
तानाजी मालुसरे गेल्यावर त्यांचा भाऊ सूर्याजी मालुसरे यास सुभेदार म्हणून नेमले तसेच तानाजीचा मुलगा रायबाच्या लग्नात आहेर घेऊन महाराज हजर राहिले. लग्नाचा संपूर्ण खर्च महाराजांनीच केला.

शिवा काशिद :  शिवा काशिद महाराजांच्या सैन्यात शिपाई गडी होता. त्याचेही नाव शिवाजी होते, तो महाराजांसारखा दिसायचा. पान्हाळगडावरून खाली उतरताना महाराजांना पुढे पाठवून स्वत:मात्र हुबेहूब शिवाजी बनून शिवाजी महाराजांना पुढे निघून जाण्यास अवधी मिळाला. सिद्दी मसूदच्या तावडीतून निसटण्यास मदत झाली. नव्या महाराजांची (शिवा काशीद) नवी पालखी सरळ नेहमीच्या मार्गाने आणि शिवाजी महाराजांची पालखी मावळ्यांच्या टोळीसह आडरानात घुसली. सिद्दी जोहारच्या हेरांनी शिवाजी पळाल्याची बातमी छावणीत सांगितली.

वीर शिवा काशिद 
सिद्दी मसूदच्या सैन्याने पालखिला गराडा घातला. पूर्वी काही जणांनी शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पहिले होते. हे प्रत्यक्ष शिवाजीराजे नसून ‘शिवाजी’ नाव असलेला नाव्ही आहे. शिवा काशीद बोलता झाला “मरणाची भीती कोणाला घालताय? जगायचे तर स्वराज्यासाठी आणि मारायचे तर स्वराज्यासाठी.” शत्रूला फसविणारा व शेवटी शत्रूकडून मारला गेलेला शिवा काशीद.

प्रतापराव गुजर : भावना उद्रेकाने बेभान होऊन अवघ्या सात विरांसह त्याने कोल्हापूरजवळ नेसरीच्या खिंडीत खानावर तुटून पडला.

सेनापती प्रतापराव गुजर 

पण १४ फेब्रुवारी १६७४ शिवाजी महाराजांचा एक निधड्या छातीचा सेनापती पडला. प्रतापराव गुजर यांच्या मुलीला महाराजांनी सून म्हणून स्वीकार केला.

मुरारबाजी देशपांडे : पुरंदरगडाची माची घेतल्यानंतर दिलेरखान बालेकिल्ल्याच्या सर दरवाजावर चढाई करण्याच्या तयारीत होता. तेव्हा मुरारबाजीने ७०० निवडक मावले घेऊन दिलेरखानाच्या पाच हजार पठाण सैनिकांवर हाल्ला चढविला.दिलेरखानावर घाव घालणार एवढ्यात दिलेरखानाच्या बाणाने शिर धडावेगळे झाले. मुरारबाजी पडला. मुरारबाजीच्या जाण्याने महाराजांना अपार दु:ख झाले.

स्वराज्यनिर्मिती साठी अनेक मोहरे कामी आले तर काही आजीवन स्वराज्याच्या दरबारात स्वामिनिष्ठ सेवा करीत राहिले. अशा रीतीने महाराजांनी स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी तरतूद केली व शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहिले. 
रयतेचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज  
                “असा राजा पुन्हा होणे नाही”...
    'शूरवीर  शिवरायांचे  मावळे' यांची थोडक्यात माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा.  

                                       gossips 360 धन्यवाद .... 

  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

                                                                                                                                                                                                          

Post a Comment (0)
Previous Post Next Post