बिरबलाची खिचडी
खूप जास्त थंडीचे दिवस चालू होते. सम्राट अकबराने एके दिवशी एक वेगळीच घोषणा केली.त्यांनी दवंडी पिटवली कि राजवाड्या समोरच्याजलकुंडात रात्रभर जर कुणी उभा राहिल्यास त्याला १०० सुवर्ण मुद्रा देण्यात येतील. ती दवंडी ऐकून एक अतिशय गरीब माणूस ते साहस करायला तयार होतो. ठरल्याप्रमाणे तो रात्रभर त्या जालकुंडात काकडत उभा राहतो. सकाळी अकबर येतो, तेव्हाही तो आपल्या जागेवर उभा असतो. पण अकबराची नजर जलकुंडाजवळ ठेवलेल्या एका छोट्याश्या दिव्याकडे जाते. अकबर विचारतो,हा दिवा रात्रभर तेवत होता का? सेवक म्हणतो होय. रात्रभर दिवा तेवत राहिल्याने जलकुंडात उभा राहणाऱ्या माणसास उब मिळाली असेल असा अनुमान अकबर काढतो. आणि १०० सुवर्ण मुद्रांचे बक्षीश देता येणार नसल्याचे बजावतो. तो गरीब माणूस बिचारा खूप दु:खी होतो. त्याला वाटतेकी आता बिरबलच आपल्याला न्याय देईल. तो बिरबलाकडे जाऊन संपूर्ण घटना सांगतो. बिरबल त्याला म्हणतो, ‘तू आता घरी जा. मी बघतो काय करायचे ते; दुसऱ्या दिवशी दरबार भरतो. रोज अगदी वेळेवर येणारा बिरबल आज आलाच नाही, म्हणून अकबर सेवकामार्फत बोलाविणे पाठवितो. सेवक बिरबलाकडे जाऊन परत येतो व बिरबल खिचडी शिजवत असल्याचे सांगतो. बिरबल खिचडी शिजल्यानंतरचं येणार असल्याने, राजा दरबाराच्या कामास सुरुवात करतो. दुपार झाल्यावरही बिरबल न आल्याने राजा सेवकाला पुन्हा पाठवतो. दुसरा सेवकही बिरबलाची खिचडी झालीच नसल्याचे सांगतो. अकबराला आचर्य वाटते. दरबार संपतो तरी बिरबल येत नाही म्हणून अकबरच बिरबलाच्या घरी जायला निघतो. तेथे गेल्यानंतर पाहतो तर काय, बिरबलाने छोटी चूल पेटवून बऱ्याच उंचीवर एका मडक्यात खिचडी शिजायला ठेवलेली असते. अकबर हसतो आणि म्हणतो, अरे बिरबल तू एवढा हुशार आणि चतुर. मग तुला एवढे समजत नाही, की खिचडी आणि विस्तवात एवढे असेल तर ती कशी तापेल? तेव्हा बिरबल म्हणतो, ‘क्षमा असावी महाराज, दूरच्या दिव्याची उब घेऊन एखादा माणूस जर रात्रभर कडाक्याच्या थंडीत उभा राहू शकतो, मग याच न्यायाने खिचडी शिजायला काय हरकत आहे? अकबराला लगेच त्याची चूक
लक्षात येते. मग रात्रभर पाण्यात उभा राहणाऱ्या माणसाला तो तातडीने बोलवणे पाठवून
शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देतो. मग तो गरीब माणूससमजवतो कि बिरबलानेच काही तरी युक्ती केली असावी मग तो माणूस अकबराकडे बघून स्मितहास्य करतो आणि १०० मोहरांचे बक्षीस घेऊन हसत हसत निघून जातो.