आतां विश्वात्मकें देवें | येणें वाग् यज्ञें तोषावें |
तोषोनी मज द्यावें | पसायदान हें || १ ||
जे खळाची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो |
भुतां परस्परें पडो | मैत्र जिवांचे || २ ||
दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्म सुर्ये पाहो |
जो जें वांछिल तो तें लाहो | प्राणीजात || ३ ||
वर्षत सकळमंगळी | ईश्वर निष्ठानची मांदियाळी |
अनवरत भूमंडळी | भेटतु भूतां || ४ ||
चला कल्पतरूंचे आरव | चेतना चिंतामणीचे गांव |
बोलते जे अर्णव | पियूषाचे || ५ ||
चंद्रमे जे अलांछन | मार्तंण्ड जे तापहीन |
ते सर्वांही सदा सज्जन | सोयरे हो तु || ६ ||
किंबहुना सर्वसुखीं | पूर्ण होवोनी तिहीं लोकीं |
भजिजो आदिपुरुखीं | अखंडित || ७ ||
आणि ग्रंथोपजीविये | विशेषीं लोकीं इयें |
दृष्टयदृष्टविजयें | हो आवें जी || ८ ||
येथे म्हणे श्री विश्वेशरावो | हा होईल दान पसावो |
येणे वरें ज्ञानदेवो | सुखिया झाला || ९ ||
पसायदान ही केवळ प्रार्थना नाही तर समाजासाठी आदर्श आणि उदात्त संकल्पना आहे.
यातील विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांचे हे पसायदान
शतकानुशतके लोकांच्या मनामनात प्रेरणा देत राहील!